कणकवली तालुका
कणकवली हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याचे मुख्यालय आहे. कणकवलीस भालचंद्र महाराज यांची समाधी असल्यामुळे या गावाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.
कणकवली हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ (NH-17) वर वसलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कणकवलीची लोकसंख्या सुमारे १६,००० आहे.
कोकण रेल्वे मार्गावर कणकवली रेल्वे स्थानक असून अनेक प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात. मुंबई, गोवा, मंगळूर आणि इतर प्रमुख शहरांशी कणकवली रेल्वेने जोडलेले आहे.
अधिक वाचा